एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यपृष्ठक्रीडाक्रिकेटWorld Cup 2019 : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी, व्यवस्थापनाचा निर्णय
मैच
World Cup 2019 : पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी, व्यवस्थापनाचा निर्णय
टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. .
By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 18 Jun 2019 04:15 AM (IST)
मुंबई : विश्वचषकात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला दोन दिवस सुट्टी दिली आहे. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी तयारीला लागणार आहे.
टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सातव्यांदा मात दिली. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला साऊदम्पटनमध्ये अफगानिस्तान विरोधात होणार आहे. मात्र या संघविरोधात तयारीच्या आधी टीम इंडियाला दोन दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. .
भारतीय संघाने गेल्या 12 दिवसात तीन सामने खेळले आहेत.तर न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाने चार पैकी तीन सामने जिंकत 6 आणि रद्द झालेल्या सामन्याचा एक असे 7 अंक कमावत गुणतालिकेत तिसऱ्या नंबरवर कूच केली आहे.
भारताने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात विजयी परंपरा कायम ठेवत विश्वचषकात सातव्यांदा पराभव केला. या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला. याा सामन्यात रोहितने 140 धावांची दमदार खेळी उभारली होती. त्याला लोकेश राहुलने 57 धावांची तर विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी करत साथ दिली होती.
Published at : 18 Jun 2019 04:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विजय शिवतारेंची 'वर्षा'वर मनधरणी; बारामतीत बंडाळी की तलवार म्यान? उद्याच भूमिका जाहीर करणार!
निवडणूक
माढ्यात मोहिते पाटील लढले नाही तर कोण? 'या' तरुण चेहऱ्याचं नाव समोर, जयंत पाटलांची माहिती
महाराष्ट्र
पन्नास कोटी घेऊन स्वतःचा ईमान विकलाय; संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
राजकारण
Supriya Sule Full PC :संजय निरुपम नाराज असतील तर यावर चर्चा झाली पाहिजे : सुप्रिया सुळे: ABP Majha
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
चंद्रकांत शिंदे
Opinion